कोरची तालुका place असून दर गुरुवारी आठवडी बाजार भरत्यात. त्यात ७२ गावातील महिला काही खरीदी व काही विक्री करीता दिवस भर बाजारात बसतात. त्यांना लघवीला जाण्यासाठी कुठेच व्यवस्था नव्हत्या हि गोष्ट २००५ ची होय. दिवस भर लघवी थांबवल्या मुळे महिल्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम पडत होत्या. ही गोष्ट कोरची तालुक्यातलं महिला संघटनाचे लक्षात आले आणि त्यांनी विचार करून निवेदन तय्यार केला. बाजाराचा दिवशी वेग वेगळ्या चौकातून बसून १५०० लोकांचे सह्या जमा करून झिल्ला अधिकारी यांना निवेदन दिले. त्यांनी महिलांचे संघटितपणे कामाला प्रोत्साहन दिले आणि हे काम १० दिवसाने पूर्ण होईल असे आश्वासन दिले. या मुळे आज कोरची तालुकेचे ठिकाणी सार्वजनिक मुतारीची व्यवस्था झाली आणि महिलांचे प्रश्न सुटले. महिला मध्ये आत्मविश्वास वाढले.